Showing posts with label corrupt indian legal machinery. Show all posts
Showing posts with label corrupt indian legal machinery. Show all posts

Saturday, January 9, 2010

रुचिका गिऱ्होत्रा प्रकरण आणि भारतीय कायदे

सध्या रुचिका गिऱ्होत्रा ह्या तरुणीने केलेली आत्महत्या, हा विषय फारच चर्चिला जात आहे. हे प्रकरण काय आहे ते पाहूया.

हरयाणाचे माजी पोलीस महासंचालक एसपीएस राठोड, ह्याने १९ वर्षापूर्वी रुचिका गिऱ्होत्रा, ह्या मुलीचा विनयभंग केला. राठोड वर खटला दाखल करण्यासाठी, आठ वर्षापेक्षा जास्त वेळ लागला. राठोडची पत्नी, व मुले, हे व्यवसायाने वकील आहेत.

दरम्यान राठोड ह्याने रुचीकाच्या कुटुंबीयांवर व त्यांचे हितचिंतक ह्यांच्यावर खोट्या केसेस (५० पेक्षा जास्त) दाखल करायला सुरुवात केली. रुचीकाच्या वडिलांवर दरोडा, खून, इत्यादी गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. तिच्या वडिलांना नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले. तिच्या भावाला, आशूला बेड्या ठोकून, त्याची, तो राहत असलेल्या ठिकाणी धिंड काढण्यात आली. पोलिसांनी आशूला कोठडीत अमानुष मारहाण केली. त्याच्यावर अनेक खोट्या केसेस करण्यात आल्या. पोलीस कोठडीत आशूच्या अंगावरून रोलर फिरविण्यात आला. आशूला पोलिसांनी अन्न पाण्याविना अनेक दिवस ठेवले. त्याला त्यांच्याच घरासमोर अमानुष मारहाण करण्यात आली. त्याचे हात पाय मोडून टाकण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडून कोऱ्या कागदांवर सही घेतली, व त्यावर त्याचा खोटा कबुलीजबाब लिहिला. रुचीकाने आपल्या भावाला झालेल्या छळामुळे १९९३ मध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. तिच्या आई वडिलांना आणि हितचिंतकांना खोट्या केसेस मध्ये गोवून, व कायद्याचा दुरुपयोग करून नरकमय यातना दिल्या गेल्या. रुचीकाच्या कुटुंबीयांवर राठोड ह्याने कायद्याच्या तरतुदींच्या आधारे अमानुष अत्याचार केला. सरतेशेवटी २००९ साली राठोडला ६ महिन्यांची कैद झाली. राठोडने रुचिका व तिच्या कुटुंबियांच्या विरुद्ध शेकडो गुन्हे व केसेस केले, पण राठोडच्या विरुद्ध फक्त एक केस !!!!!! वा रे कायदा.

पोलिसांनी ज्या खोट्या केसेस केल्या, त्याबद्दल कोणी ब्र सुद्धा उच्चारात नाही आहेत. टीव्ही चेनेल वाले फक्त मसाला लावून बातम्या सांगत आहेत. त्यांच्यासाठी हा करमणुकीचा विषय आहे. इथे लोकांचा जीव जात आहे, आणि ह्यांचा खेळ होत आहे. राष्ट्रीय महिला आयोग व इतर महिला संघटना ह्यांच्या संकुचित दृष्टिकोनामुळे , गिऱ्होत्रा कुटुंबियांना न्याय मिळणे अशक्य आहे.


ह्या सगळ्या प्रकरणाचे संक्षिप्त वर्णन म्हणजे, एका पोलीस अधिकाऱ्याने कायद्याचा आधार घेत, एका निरपराध कुटुंबाला नरकमय यातना दिल्या. जेवढा हा अधिकारी दोषी, तेवढाच दोष आपल्या न्यायसंस्थेचा, व कायद्याचा आहे. मूळ कारण आहेत, आपल्या देशाची कायदेशीर यंत्रणा. जी अतिशय भ्रष्टाचारी आहे. जीचा वापर करून निरपराध व्यक्तींना, त्रास दिला जातो. पण "आग सोमेश्वरी अन बंब रामेश्वरी". सरकारचे व महिला संघटनांचे म्हणणे असे आहे, कि आणखी एक नवीन कायदा करा. त्या नवीन कायद्या अन्वये, महिलेची छेड काढणारा कायदा बदला, व ६ महिन्या एवजी, ५ वर्षाची शिक्षा द्या. हे म्हणजे, राठोड सारख्या, माणसांना बळ देण्यासारखे आहे. म्हणजे भविष्यात ह्या कायद्याचा (गैर) वापर रुचिका सारख्यांच्या कुटुंबीयांवर आणखी खोट्या केसेस केल्या जाणार.



अशाच प्रकारे, भारतात आज अनेक व्यभिचारी स्त्रिया असाच कायद्याचा दुरुपयोग करून आपल्या पती व त्याच्या इतर नातेवाईकांच्या विरुद्ध खोट्या केसेस करून त्यांना नरकमय यातना देत आहेत. ४९८अ , हिंदू विवाह कायदा, घरगुती हिंसाचार कायदा, पोटगी साठी पत्नीच्या बाजूने उघडपणे दिले जाणारे पक्षपाती निर्णय, ह्यामुळे लाखो तरुणांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर अन्याय होत आहे. पण मुर्दाड समाज झोपलेलाच आहे.